१० तारखेला संगमनेर मध्ये संक्रांत निमित्त भारत स्वाभिमान चा हल्दी कुंकू चा कार्यक्रम पार पडला. शहराच्या वेग वेगळ्या आठ विभागामध्ये हा कार्यक्रम घेण्यात आला. सर्व ठिकाणी मिळून ३०० च्या दरम्यान महिलानी यात भाग घेतला. ठराविक नमुन्यातील निमंत्रण पत्रिका, भारत स्वाभिमान पत्रकाचे, 'वान ', निवेदन पत्रावर सह्या घेणे , व २७ तारखेच्या आंदोलनाचे निमंत्रण हे या कार्यक्रमाचे वैशिस्ट होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौ अनीता देशमुख , सौ मंजुषा गोडगे, श्रीमती लतिका सोनवने, सौ कुंदा मुरुमकर, सौ अलका दिवेकर, सौ अनीता शिर्के व सौ स्नेहलता पानसरे यानी विशेष परिश्रम घेतले.
सौ अनिता देशमुख, संगमनेर तालुका महिला प्रभारी,
No comments:
Post a Comment